फ्रेंच राज्यक्रांतीची 1789 कारणे व परिणाम लिहा.docx.pdf
औरंगजेब धार्मिक धोरण.pdf
1. प्रश्न - बादशहा औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाचे वर्णन करा.
प्रस्तावना :
● पूर्ववर्ती इस्लामी शासकांना भारतीयांचा होणारा विरोध लक्षात घेऊन बादशाह अकबरने उदारमतवादी,
सहिष्णु धार्मिक धोरणाचा पुरस्कार क
े ला.
● त्यामुळे त्याच्या काळात इस्लाम हा राजधर्म राहिला नाही. त्याचा परिणाम म्हणून भारतीयांची मदत
अकबराला मिळाली त्यामुळे मुगल साम्राज्य भारताच्या विशाल भूभागावर विस्तारित झाले.
● परंतु औरंगजेबाने अकबराच्या उदारमतवादी, सहिष्णु धोरणात बदल करून सुन्नी पंथीय इस्लामनुसार
धार्मिक धोरणाचा अवलंब क
े ला.
औरंगजेबचा धार्मिक दृष्टिकोन :
● औरंगजेब कट्टर सुन्नी पंथीय मुस्लिम असून क
ु रानाप्रमाणे वागणारा होता.
● म्हणून त्याने इस्लामला आपला राजधर्म घोषित क
े ले आणि दार-उल- हर्ब च्या देशाला दार-उल- इस्लाम
मध्ये परावर्तित करणे हे ध्येय ठरविले.
● आणि जोपर्यंत संपूर्ण देश इस्लाममय होत नाही तोपर्यंत त्या जनतेला (गैरमुस्लिम) राजकीय व आर्थिक
अधिकार तसेच राज्याच्या कोणत्याही सवलती द्यायचा नाही या धोरणाचा पाठपुरावा सुरू क
े ला.
त्यानुसार:
1. औरंगजेबाने गैरमुस्लिम रीतीरिवाजांवर प्रतिबंध लावणे सुरू क
े ले. इस्लामी कायद्याचा अंमल सुरू क
े ला.
2. क
ु राणातील नियमाप्रमाणे प्रजा आचरण करतात की नाही यावर लक्ष देण्यासाठी मूहतशीब नियुक्त क
े ले.
3. क
ु राणानुसार अनुचित आहे म्हणून दरबारातील नृत्य, संगीत, झरोका दर्शन, बादशहाची तुला इत्यादी
प्रथा बंद क
े ल्या.
4. मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यावर प्रतिबंध लावले.
5. आपल्या धार्मिक धोरणानुसार औरंगजेबाने गैर मुस्लिमांचा द्वेष क
े ला. त्यांची मंदिरे पाडून तिथे मशिदी
उभारल्या. ( उदाहरणार्थ काशीचे विश्वनाथ मंदिर, मथुरेचे क
े शव देव मंदिर व सौराष्ट्रातील सोमनाथ
मंदिर), देवतांच्या मूर्ती फोडल्या, हिंदूंचे धार्मिक सण, उत्सव , मेळावे इत्यादींवर बंदी घातली.
6. हिंदूवर पुन्हा जजीया कर लावला. तीर्थयात्रा कर पुन्हा लावला. प्रयाग येथील गंगास्नानावर सव्वासहा
रुपये कर लावला.
7. धर्म परिवर्तनासाठी आमिषे दाखविली. प्रसंगी जबरदस्ती ही क
े ली.
8. राजपूत सोडून इतर हिंदूबाबत पालखी, हत्ती, इराणी घोडे, शस्त्रास्त्रे इत्यादींच्या वापरावर प्रतिबंध लावला.
9. त्यामुळेच प्रो. आर. एस. शर्मा लिहितात,
"कधीकधी तो लोकांना बळजबरीने मुसलमान बनवीत असे त्यामुळे चाणाक्ष अकबराला मिळालेले हिंदूचे
सक्रीय सहकार्य शहाजहांनच्या असंयुक्तीक धार्मिक धोरणामुळे कमक
ु वत झाले तर औरंगजेबच्या कर्मठ,
सनातनी कृ त्यामुळे ती सहकार्याची भावना नामशेष झाली."
धार्मिक धोरणाचा प्रभाव :
● अशाप्रकारे औरंगजेबने सनातनी धार्मिक धोरणाचा अंमल क
े ला त्यामुळे गैरमुस्लिमांमध्ये
औरंगजेबाविषयी द्वेष निर्माण झाला.
2. ● त्यांनी मुगल सत्तेविरुद्ध बंड करण्यास सुरुवात क
े ली. राजारामच्या नेतृत्वात जाटांनी. सतनामी.
छत्रसालच्या नेतृत्वात बुंदेलेंनी, गुरू तेगबहादुर व गुरु गोविंद सिंहांच्या नेतृत्वात शिखांनी, दुर्गादास
राठोड च्या नेतृत्वात राजपुतांनी आणि राजाराम व राणी ताराबाई यांच्या नेतृत्वात मराठे इत्यादींनी
औरंगजेबाच्या धार्मिक धोरणाविरुद्ध प्रचंड लढे दिले.
● काही बंड मोडून काढण्यात औरंगजेब यशस्वी झाला. परंतु बुंदेले, राजपूत व मराठ्यांचे सशक्त बंड
अखेरपर्यंत त्याला मोळता आले नाही.
● परिणामी त्याचे धार्मिक धोरण असफल ठरुन ते अंतिमत: मुघल साम्राज्यास हानीकारक सिद्ध झाले.