1. प्रश्न : अनऔद्योगीकरण म्हणजे काय ते सांगून अनऔद्योगीकरणाचे कारणे व परिणाम लिहा.
अ. प्रस्तावना:
● ब्रिटिशांनी स्वयंपूर्ण ग्राम जीवनावर आधारलेली भारतीय अर्थव्यवस्था मोडून टाकली.
● अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय उद्योग भरभराटीस आलेले होते. रेशीम, लोकरी कापड, खनिजे,
तेल, धातूंची भांडी, शस्त्रास्त्रे, दाग-दागिने, कोरीव काम, चांमळ्याच्या वस्तू, रंगद्रव्य, कागद, जहाज
बांधणी इत्यादी परंपरागत उद्योग.
● व्यापारी क
ें द्रे - ढाका, मुर्शिदाबाद, पाटणा, जौनपूर, वाराणसी, लखनऊ, आग्रा, मुलतान, लाहोर,
अहमदाबाद, सुरत, चंदेरी, ब-हानपूर, मच्छलीपट्टण, विशाखापट्टम, औरंगाबाद, बंगलोर, कोईमतुर,
मदुराई ही कापड उद्योग क
ें द्र. काश्मीरमध्ये लोकर, बंगाल, महाराष्ट्र, आंध्र प्रदेशात जहाज बांधणी
उद्योग.
● अठराव्या शतकात भारत जगातील व्यापार-उद्योगाचे महत्त्वाचे क
ें द्र.
● ब्रिटिश काळात समृद्धीला ग्रहण लागले व भारतातील लघु, क
ु टीर उद्योग व औद्योगिक क
ें द्रे यांचा ऱ्हास
सुरू झाला व भारताचे अन औद्योगीकरण झाले.
● कृ षी आधारित स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था मोडीत निघाली.
● अनऔद्योगीकरण : ब्रिटिश काळात संपन्न शहरांमधील कसबी उद्योगांचा, हस्त उद्योगांचा आणि
स्वयंपूर्ण खेड्यांमधील क
ु टीर उद्योगांचा सुद्धा ऱ्हास घडून आला. या प्रक्रियेला अनऔद्योगीकरण असे
म्हणतात. (1800 ते 1850)
ब. अनऔद्योगिकरणाची कारणे :
१. भारतीय राजे-राजवाड्यांचे पतन:
● भारतात जसजसे ब्रिटिश साम्राज्य वाढू लागले तस तसा देशी सत्तांचा ऱ्हास झाला. त्यामुळे देशी
राज्यकर्त्यांकडून देशी कारागिरांना असलेला राजाश्रय समाप्त झाला.
● राजाश्रय संपल्याने राजे-राजवाडे, जहागीरदार, सरंजामदार यांच्याकडून होत असलेली मागणी एकदम
घटली.
● करागिरांना मिळणारी मदत व प्रोत्साहन बंद झाले.
● त्यामुळे संबंधित हस्तउद्योग व क
ु टीर उद्योगांचा ऱ्हास झाला.
● राज्य लयास गेल्याने किं वा संस्थाने शक्तीहीन व ब्रिटिशांवर अवलंबून राहू लागल्याने लष्करी साहित्याचे
विशेषतः शस्त्रास्त्रांचे उत्पादन चांगलेच मंदावले.
२. इंग्रजांचे अनुकरण:
● शिल्लक असलेल्या संस्थानिकांनी आपले राहणीमान व खानपान इंग्रजांप्रमाणे करणे सुरू क
े ले.
● संस्थानिकांचे अनुकरण सुशिक्षित भारतीयांनीही करणे सुरू क
े ले. परिणामी भारतीय वस्तूंची मागणी कमी
होऊन भारतीय हस्त उद्योग व क
ु टीर उद्योगाला घरघर लागली.
३. ईस्ट इंडिया क
ं पनीचे स्वार्थी व जुलमी धोरण
● बादशाह कडून मिळालेल्या करमुक्त व्यापारी परवान्याचा क
ं पनी व क
ं पनीच्या अधिकाऱ्यांकडून गैरवापर.
2. ● वापर खाजगी व्यापारासाठी करीत.
● परवाने भारतीय व्यापाऱ्यांनाही विकत असे.
● बाजारात क
ं पनीचा माल स्वस्तात विकला जात असे.
● क
ं पनीचे अधिकारी भारतीय कारागिरांचा छळ करीत.
● भारतीय उत्पादकांना क
ं पनीस कमी किमतीत माल विकावा लागत.
● या जुलमांमुळे कित्येकांनी आपले उद्योग बंद क
े ले.
४. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती :
● भारतीय कारागीर इंग्लंडमधील यंत्रोत्पादित माल व वेगाशी स्पर्धा करू शकला नाही.
● यंत्रोत्पादित माल हस्तोद्योगातील मालापेक्षा अधिक स्वस्त बाजारात मिळत असे.
● रजनी पाम दत्त म्हणतात, 'इंग्लंडमधील यंत्रनिर्मित कापड मालामुळे विणकर बेकार झाले. 1818 ते
1836 या काळात इंग्लंडमधून भारतात होणाऱ्या सुताच्या निर्यातीत 5200 पटींनी वाढ झाली. हीच
प्रक्रिया रेशमी व लोकरी माल, लोखंड, भांडी, काच व कागद यांच्या बाबतीत दिसून येते.'
५. भारतीय कारागिरांकडे नव्या तंत्रज्ञानाचा अभाव :
● औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमधील उत्पादन वाढले. ते स्वस्तात व लवकर तयार होऊ लागले, दिसायला
चांगले असू लागले, त्यामुळे भारतीय बाजारपेठेत मागणी वाढली.
● भारतीय हस्तकारागिरांना तंत्रज्ञानाच्या अभावी उत्पादनात अधिक वेळ व अधिक खर्च येत. परिणामी
बाजारात जास्त किमतीला येत असे.
● त्यामुळे बाजारपेठेत मागणी कमी झाली. त्याचा परिणाम हस्तोद्योगांच्याच्या ऱ्हासात झाला.
६. भारतातून कच्च्या मालाची निर्यात :
● इंग्रज त्यांच्या उद्योगधंद्यांना आवश्यक असणारा कच्चामाल भारतातून इंग्लंडला पाठवीत असे. तसेच
त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या.
● इंग्लंडला निर्यात होणाऱ्या कच्च्या मालांमुळे भारतीय कारागिरांना कच्चामाल मिळत नसत.
● त्यामुळे कच्चामाल अभावी भारतीय उद्योग (हस्तोद्योग व क
ु टीरोद्योग) बंद झाले.
७. संरक्षक जकाती व एक मार्गी खुला व्यापार :
● इंग्लंडने इंग्लंडच्या उद्योगांना संरक्षण देण्यासाठी संरक्षक जकात आकारली.
● 1700 व 1720 मध्ये इंग्लंडने कायदे करून भारतीय सुती व रेशमी कापडाच्या वापरावर
इंग्लंडवाशियांसाठी निर्बंध लादले.
● भारताच्या सत्ताप्राप्तीनंतर इंग्रजांनी भारतात त्यांचा यंत्रोत्पादित माल खुलेपणाने विकणे सुरू क
े ले.
● भारतातून इंग्लंडमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर अत्याधिक कर लावले.
● इंग्लंड मधून भारतात येणाऱ्या मालावर नाममात्र कर आकारले.
● परिणामी इंग्लंडचा माल भारतीय बाजारपेठेत स्वस्त तर भारताचा माल युरोपियन बाजारपेठेत महाग
ठरू लागला.
● बाजाराच्या नियमानुसार भारतीय मालाला बाजारपेठ बंद झाली. त्यामुळे बाजारपेठे व शासकीय
संरक्षणाअभावी भारतीय क
ु टीर व हस्तद्उद्योग डबघायीस आले व बंद झाले.
८. लोहमार्गाचा विकास :
3. ● रेल्वे, दळणवळण व संपर्काच्या आधुनिक साधनांचा उपयोग भारतीय व्यापार-उद्योगांपेक्षा ब्रिटिशांच्या
व्यापार-उद्योगांना अधिक झाला. कारण त्यांचा माल देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.
● दारच्या यंत्रनिर्मित मालाशी घरचा कारागीर स्पर्धा करू शकला नाही. या दृष्टीने 'दुसऱ्याच्या पत्नीला
सजवणे' असे रेल्वे विस्ताराबाबतचे लोकमान्य टिळक यांचे मार्मिक उद्गार लक्षात घेण्याजोगे आहे.
९. वरील कारणांशिवाय भारतात इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव, अशांती आणि अराजकता, सरकार द्वारे व्यापार मेळावे
व प्रदर्शने भरविणे, भारतीय उद्योजकांकरिता दळणवळण साधनांचा अभाव इत्यादी कारणे ही भारताच्या अन
औद्योगीकरणास कारणीभूत ठरली.
१०. बी. डी. बसू यांचे मते , भारतातील राजकीय सत्ता हस्तगत क
े ल्यापासून इंग्लंडने :-
1. ब्रिटिश खुला व्यापार भारतावर लादून.
2. भारतीय उत्पादकांच्या मालावर इंग्लंडमध्ये मोठ्या जकाती लादून.
3. भारतातून कच्च्या मालाची निर्यात करून.
4. अंतर्गत जकाती व अबकारी कर लादून.
5. भारतातील ब्रिटिशांना खास सवलती देऊन.
6. भारतात लोहमार्ग बांधून.
7. भारतीय कारागिरांवर त्यांची व्यावसायिक गुपिते फोडण्याची सक्ती करून.
8. प्रदर्शने भरवून.
भारतीय उद्योगधंदे उध्वस्त क
े ले.
क. अनऔद्योगीकरणाचे परिणाम
१. कारागीर बेकार झाले
● हस्तोद्योग व क
ु टीर उद्योगांचा ऱ्हास झाल्याने त्यातील असंख्य कारागीर विशेषतः सूतकताई करणारे व
विणकर बेकार झाले.
● त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध न झाल्याने बेकारी प्रचंड वाढली.
२. शेतीवरील भार वाढला
● उद्योगधंद्यांच्या ऱ्हासामुळे बेकार झालेले असंख्य कारागीर शेतीकडे वळले. त्यामुळे शेतीवरचा भार
वाढला.
● ज्यांच्याजवळ जमीन नव्हती ते शेतमजूर झाले.
● 1850 मध्ये भारताच्या लोकसंख्येत शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या सुमारे 53% होती तर ती
1901 ला 63.70% तर 1941 ला 70 टक्क
े एवढी झाली.
३. स्वयंपूर्ण ग्रामजीवनाचा ऱ्हास
● ग्रामीण भागातील उद्योगधंदे ऱ्हास पावले.
● वस्तू विनिमय पद्धतीची जागा रोखीच्या व्यवहाराने घेतली.
● गावाच्या गरजा गावात भागेनाशा झाल्या.
● स्वयंपूर्ण खेडी परावलंबी बनली व बाहेरच्या बाजाराशी जोडली गेली.
● अन्नधान्य व कच्चामाल प्रदेशात तर परदेशी माल देशात येऊ लागला.
4. ४. उद्योगप्रधान शहरांचा ऱ्हास
● भारतातील उद्योगांच्या ऱ्हासामुळे उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरांचाही ऱ्हास घडून आला.
● रजनीपाम दत्त लिहितात, ' ढाका, मुर्शिदाबाद, सुरत व त्यासारखी उद्योगसंपन्न शहरे इंग्रजांच्या
शासनाखाली थोड्याच वर्षात महाभयंकर युद्धाच्या विध्वंसाने किं वा परकीय आक्रमणाने झाली नसती
इतकी पुरेपूर उध्वस्त झाली होती.'
● सर जाॅन ट्रेट हेल्यन, 'ढाक्याची लोकसंख्या 1,50,000 वरून 30 ते 40 हजारापर्यंत घटली आहे. आणि
गावावर जंगलाचे व मलेरियाचे वेगवान अतिक्रमण सुरू झाले आहे. भारताचे मँचेस्टर असणाऱ्या समृद्ध
ढाका शहराचे रूपांतर एका अत्यंत दरिद्री व छोट्या गावात झाले आहे. तेथील दैन्याला खरोखर पारावार
राहिलेला नाही.'
५. राष्ट्रीय अर्थव्यवस्था व जनजागृती
● खेड्यांची बंदिस्तता कमी होऊन खेडी बाह्य बाजारपेठ, राष्ट्रीय अर्थव्यवस्था तसेच जागतिक
अर्थव्यवस्थेशी जोडल्या गेली.
● खेड्यांच्या व क
ु टीर उद्योगांच्या ऱ्हासाविरुद्ध राष्ट्रीय नेत्यांनी आवाज उठविला. आर्थिक राष्ट्रवादामुळे
स्वदेशीचा पुरस्कार क
े ला जाऊ लागला.
● उध्वस्त कारागिरांच्या जाणिवा व्यापक होऊन त्यांच्या संघटना उभ्या राहू लागल्या. बेरोजगार शहरांकडे
वळले, भारतीय समाज ढवळून निघू लागला.
● हे सारे मंथन राष्ट्रीय जागृतीला पूरक ठरले.
६. वरील परिणामांशिवाय
● भारत कच्चामाल पुरविणारे राष्ट्र बनले.
● भारत माल आयात करणारा देश ठरला.
● आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताचे स्थान घसरले.
● नवीन औद्योगिक शहरांचा उदय झाला.
● हस्तोद्योग कारागीर औद्योगिक कामगार झाला.
● भारत इंग्रजांची हुकमी बाजारपेठ झाला.
ड. अनऔद्योगिकरणाचे मूल्यांकन:
1. ब्रिटिश काळात भारतात सर्वत्र सरसकट औद्योगिक ऱ्हास घडून आला असे मानणे चुकीचे आहे.
2. ऱ्हास वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या क्षेत्रात, वेगवेगळ्या वेळी, कमी अधिक प्रमाणात झाला.
3. दरबारी गरजा पुरविणाऱ्या उंची उत्पादनांचा ऱ्हास जेव्हा झाला तेव्हा देशाच्या अंतर्भागातील ग्रामीण
क
ु टीर उद्योग उजाड झालेले नव्हते.
4. ब्रिटिश भांडवलशाहीचे 18-19 व्या शतकापासूनचे आक्रमण काय किं वा भारतीय भांडवलशाहीचा 19-20
व्या शतकातील विकास काय त्यामुळे भारतीय हस्तोद्योगांवर व क
ु टीरोद्योगांवर आघात होणे ही
ऐतिहासिक अपरिहार्यता होती.
5. खेड्यांची बंदिस्तता संपून ती राष्ट्रीय प्रवाहाशी जोडली जाणे आवश्यक होते, ग्रामोद्योगांच्या
पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांना कालमानानुसार काही मर्यादा पडणेही स्वाभाविक होते.
6. खेड्यांची स्वयंपूर्णता जशी काही दृष्टीने फायदेशीर होती तशीच त्यामुळे खेळ्यांना आलेली बंदिस्तता
घातक होती. या बंदिस्ततेमुळे पारंपारिक व्यवस्थेची प्रतिगामी चौकट सुरक्षित राहिली होती. म्हणूनच
ग्रामराज्याच्या यशस्वीतेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साशंक होते.
5. एक
ं दरीत जुन्या व्यवस्थेची घडी बदलणे आवश्यक व अपरिहार्य होते. मात्र ही घडी बदलण्याची
प्रक्रिया परकीय साम्राज्यशाही व भांडवलशाही शासनाने लादल्यामुळे भारताला त्या बदलाची विलक्षण स्थळ
पोहोचली. औद्योगिक ऱ्हासाचा विचार करताना हे विचारात घेतले पाहिजे.