1. प्रश्न - वर्धमान महावीर यांचे चरित्र सांगून त्यांची शिकवण स्पष्ट करा.
प्रस्तावना :-
इसवी सन पूर्व सहाव्या शतकात आर्य - अनार्य विचारधारेतील संघर्ष, वैदिक धर्मातील कर्मकांड, ब्राह्मणांचे
नैतिक पतन, संस्कृ त भाषेतील वैदिक साहित्य, समाजव्यवस्थेतील जातीवाद, यज्ञाला मिळालेले अतिरिक्त
महत्व, आणि सामान्य लोकांचे होत असलेले आर्थिक शोषण यामुळे भारतात धार्मिक क्रांती घडून आली. परिणामी
त्यातून अनेक धार्मिक विचारधारांचा उदय झाला. वैदिक धर्मावर तीव्र आघात झाले. धार्मिक कर्मकांड व
जातीवादाची पकड सही झाली, त्यातील अनेक धार्मिक विचार प्रवाहातील जैन व बौद्ध विचार सरनींचा जनतेने
मोठ्या प्रमाणात स्वीकार क
े ला त्यामुळे त्यांचा इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भारतात धर्म म्हणून उदय झाला.
जैन धर्माचे संस्थापक ऋषभदेव होते तर वर्धमान महाविर हे चोविसावे तीर्थंकर होते. महावीरांनी जैन
तत्त्वज्ञानाला व्यवस्थित आकार देऊन त्याचा प्रचार, प्रसार क
े ला. अशा वर्धमान महावीर यांचे चरित्र व शिकवण
पुढील प्रमाणे -
वर्धमान महावीर यांचे चरित्र:-
पूर्वचरित्र-
वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तीर्थंकर होय. त्यांचा जन्म क
ुं दग्राम येथे इसवी सन पूर्व 539
मध्ये राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला देवी या दाम्पत्याच्या पोटी झाला. वर्धमान राजक
ु मार असल्याने त्यांचे
बालपण सुखात गेले. त्यांचा विवाह यशोदा नावाच्या मुलीशी झाला, तिच्यापासून त्यांना प्रियदर्शनी (अनोज्जा)
नावाची मुलगी झाली. वयाच्या तीस वर्ष पर्यंत महावीरांनी संसार क
े ला.
गृहत्याग व ज्ञानप्राप्ती-
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर महावीरांमधील विरक्ती अधिकच वाढली त्यामुळे त्यांचे लक्ष चिंतन मननामध्ये
राहू लागले. शेवटी त्यांनी अग्रज नंदिवर्धनची आज्ञा घेऊन गृहत्याग क
े ला आणि सत्य व वास्तविक ज्ञानाचा शोध
घेऊ लागले.
आचारंग सूत्रानुसार वर्धमान दिगंबर वृत्तीने राहून ज्ञानाचा शोध घेत होते. झालेला विविध प्रकारचा त्रास
तटस्थ वृत्तीने सहन करीत त्यांनी 12 वर्ष कठोर तपश्चर्या क
े ली. त्यानंतर ऋजू पालिका नदीच्या काठावर शाल
वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले, त्यामुळे ते अहर्त, क
ै वल्य व निर्ग्रंथ म्हणून ओळखले जाऊ लागले. क
े वल
ज्ञानप्राप्तीने त्यांनी इंद्रिय विजय मिळविला म्हणून ते महावीर जैन या नावाने ओळखल्या जावू लागले.
धर्मप्रसार व महानिर्वाण -
ज्ञानप्राप्ती नंतर महावीरांनी धर्म प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू क
े ले. सतत 20 वर्ष मगध,
कोसल, अंग, मिथिला या प्रदेशात धर्मप्रसार क
े ला आणि इ. स. पूर्व 467 मध्ये वयाच्या 72 व्या वर्षी पावा येथे
त्यांचे महापरिनिर्वाण झाले.
महावीरांची शिकवण(जैन धर्माची शिकवण) :-
महावीर व इतर जैन तिर्थंकरांनी ज्या तत्त्वाचा प्रचार प्रसार क
े ला ते तत्त्व म्हणजे जैन धर्माची शिकवण होय.
1. पंचमहाव्रते -
2. महावीराने चरित्र निर्माण करण्यासाठी पंचमहाव्रते सांगितले आहे.
अ. सत्य-
असत्याचा त्याग करून सत्य बोलावे. सत्य सर्वांसाठी प्रिय आहे सत्याचे पालन क
े ल्याने मनुष्य लोभ,
क्रोध व भय यापासून मुक्त होतो
ब. अहिंसा-
अहिंसा श्रेष्ठ धर्म असल्याने मन, वाचा, व कृ तीने अहिंसा व्रताचे पालन करावे. त्यासाठी दुसऱ्याशी वाईट
वागू नये, कोणाचे मन दुखवू नये, कटू बोलू नये व कार्य करताना जीव हत्या होणार नाही याची काळजी घ्यावी.
क. अस्तेय-
कोण्या दुसऱ्याची वस्तू त्याच्या परवानगी शिवाय स्वीकारू नये किं वा त्यावर आपला अधिकार सांगू नये.
ड. अपरिग्रह-
इंद्रिय सुख उत्पन्न करणाऱ्या वस्तूंचा त्याग करावा आणि जे आपल्याला आवश्यक आहे त्यापेक्षा
जास्त भौतिक वस्तूंचा स्वीकार करू नये.
इ. ब्रह्मचर्य -
सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग करून जीवन जगावे. वासना मानसिक, शारीरिक, सुक्ष्म, स्थूल, एैच्छिक,
पारलौकिक इत्यादी कोणत्याही असो त्यांचा त्याग करावा.
याच पाच नियमांना धर्मज्ञा असे म्हणतात. या नियमांचे कडक पालन करणे म्हणजे तपश्चर्या होय.
त्यामुळेच निर्वाण पद प्राप्त होऊ शकते असे जैन धर्म मानतात.
2. त्रिरत्ने :-
अ. सम्यक ज्ञान
सम्यक ज्ञान म्हणजे सत्य व संपूर्ण ज्ञान होय व ते तीर्थंकरांच्या उपदेशाने प्राप्त होते. त्याच्या
प्राप्तीने सत्य आणि असत्य यातील फरक स्पष्ट होतो आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो.
ब. सम्यक दर्शन
सम्यक दर्शन म्हणजे सत्यावर विश्वास ठेवून वास्तव ज्ञानावर श्रद्धा ठेवणे होय. महावीर सर्वज्ञ आहे यावर
विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे, आचरण करणे महत्त्वाचे आहे.
क. सम्यक चरित्र
सम्यक चरित्र याचा अर्थ सत कार्याचे आचरण करणे, अहितकारक कार्य वर्ज करून हितकारक कार्य करणे.
भौतिक जीवनाविषयी अनासक्त होऊन नैतिक जीवनाची कास धरणे असे सांगितले.
3. 3. इतर तत्वज्ञान:-
अ. महावीर अनईश्वरवादी होते. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व मान्य क
े ले नाही. सृष्टीचे चक्र ईश्वरी शक्तीने
चालत नाही तर तिच्या कार्यकारण भावाने चालतात असे ते म्हणत.
ब. सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे वेद होय हे महावीर यांना मान्य नव्हते, म्हणून त्यांनी वेदांची प्रामाणिकता
नाकारली.
क. महावीरांना ईश्वराचे अस्तित्व मान्य नसले, तरी आत्म्याचे अस्तित्व मान्य होते. आत्मा अजर,
अमर असून तो जीव - अजीव अशा दोन्ही ठिकाणी वास करतो. आत्म्याचे स्वरूप एक नसून ते भिन्नभिन्न आहे
असेही जैन धर्म मानतो.
ड. जीव आणि आत्मा यांचा अतूट संबंध आहे. कर्म बंधनामुळे आत्मा सांसारिक पाशात अडकतो म्हणून
आत्म्याचा पुनर्जन्म होतो. आत्मा कर्म मुक्त करण्यासाठी आत्म ज्ञान प्राप्तीची गरज आहे. आत्म ज्ञान प्राप्तीने
इंद्रिय विजय मिळविता येते.
इ. मनुष्याने वर्तमान जन्मात सत्कर्म क
े ल्यास तो पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त होतो, यालाच निर्वाण
पद म्हणतात. त्यासाठी संयम, सदाचार व तपश्चर्या हे मार्ग सांगितले आहे.
4. इतर वैशिष्ट्ये:-
अ. मानवी जीवनाला कर्म मुक्त करण्यासाठी जैन धर्म भौतिक सुखाचा त्याग करून सन्यस्त वृत्तीने
रहाण्यास सांगतात.
ब. जैन धर्म व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. मनुष्य स्वतःच स्वतःचा भाग्य विधाता असल्याने त्याला
कर्मकांड करण्याची गरज नाही. धार्मिक कर्मकांडापेक्षा नैतिकता, चारित्र्य यावर जैन धर्म भर देतो.
क. जैन धर्म वैदिक देवतांना न माणता तीर्थंकरांना श्रेष्ठ मानून त्यांची उपासना व आदेशाचे आचरण
करण्यावर भर देतो.
_____________________________________
जैन धर्मातील पंथ
इ. स. पूर्व चौथ्या शतकात मगध प्रांतात भयंकर दुष्काळ पडला, तेव्हा जैन आचार्य भद्रबहू
यांच्या नेतृत्वात काही जैन भिक्षू दक्षिणेतील म्हैसूर येथे गेले. आणि बारा वर्षानंतर ते सर्व मगध येथे परत आले,
तेव्हा मगध येथील भिक्षू व मैसूर वरून परत आलेले भिक्षू यांच्यात महावीराच्या तत्वज्ञानावरुन वाद निर्माण
झाला. तेव्हा महावीरांच्या मूळ तत्वज्ञानात बदल करणाऱ्या अनुयायांना श्वेतांबर पंथीय तर मूळ तत्वज्ञानाला
मानणार्
या अनुयायांना दिगंबर पंथीय म्हटल्या जाऊ लागले.
श्वेतांबर पंथ :-
4. 1. श्वेतांबर पंथाचा प्रमुख शंभुतविजय हा होता. या पंथीयांनी पार्श्वनाथला आपले गुरु मानले.
2. श्वेतांबर पंथीय श्वेत वस्त्र (पांढरे वस्त्र) वापरीत असे.
3. स्त्री मोक्षाची अधिकारी आहे. तिलाही क
े वलज्ञान प्राप्त होऊ शकते.
4. श्वेतांबर पंथीय काही उपकरणे व पात्रे वापरतात
5. बारा स्वर्ग मानतात.
6. अर्वाचीन काळात पुजा प्रसंगी मूर्तीला फ
ु ले वाहून मिठाईचा नैवेद्य देतात.
7. हिंसेच्या भीतीने रात्री दिवा सुद्धा लावत नाही.
8. बहुसंख्य ग्रंथ अर्धमागधी भाषेत आहे.
9. पीठ अथवा मठ नाही.
10. हा पंथ सुधारणावादी प्रवृत्तीचा होता. आणि त्याचा प्रभाव प्रामुख्याने उत्तर भारतात होता.
दिगंबर पंथ:-
1. या पंथाचा प्रमुख भद्रबहू हा होता. या पंथीयांनी महावीराला आपले गुरू मानले.
2. या पंथाचे लोक वस्त्र वापरत नाही.
3. या पंथानुसार स्त्रीला मोक्ष प्राप्त होत नाही.
4. या पंथीयांना उपकरणाची आवश्यकता नसते. कर पात्रात भोजन करतात.
5. सोळा स्वर्ग मानतात
6. तांदूळ व सुगंधी पदार्थ वापरतात.
7. भरपूर पाण्याने मूर्तीला स्नान घालतात.
8. कोणत्याही वेळेस पूजा करणे प्रशस्त मानतात.
9. या पंथाचे प्रमुख ग्रंथ संस्कृ त भाषेत आहे.
10. या पंथाचा प्रभाव दक्षिण भारतात जास्त होता.
_____________________________________
5. जैन धर्माच्या प्रसाराची कारणे:-
1. महावीराचे व्यक्तिमत्व
2. जैन धर्माची साधी शिकवण
3. लोक भाषेचा स्वीकार
4. प्रभावी जैन संघ
5. जैन धर्माला मिळालेला राजाश्रय
जैन धर्माच्या मर्यादित विस्ताराची कारणे:-
1. गुंतागुंतीचे तत्वज्ञान
2. कठोर नियम व अहिंसेवर अतिरिक्त भर
3. नवीन तत्वाचा अभाव
4. सामाजिक भेदभाव. 5. प्रभावी प्रचारकांचा अभाव
6. बौद्ध धर्माचा प्रभाव
7. दीर्घकालीन राजाश्रयाचा अभाव. 8. जैन धर्मातील पंथ भेद
9. वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन
10. इस्लामचे आक्रमण
----------------------_---------------------------------
जैन कला :-
जैन धर्माला मौर्य, कदंब, चालुक्य, राष्ट्रक
ू ट इत्यादी राजांनी राजाश्रय दिला होता. त्यांच्या आश्रयाने जैन कला
निर्माण झाली. जैन वास्तूचा उपयोग उपासना स्थाने किं वा जैन साधूंच्या निवासाकरिता क
े ला जाई.
जैनांचे स्तूप पाषाण कठडे. प्रवेश द्वार इत्यादींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचा सुंदर नमुना मथुरेत दिसून येतो.
जैनांनी महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या पदचिन्ह याची निर्मिती क
े ली. श्रवणबेळगोळा येथील बाहुबली ची मूर्ती जैन कला व
स्थापत्यकलेचा उत्कृ ष्ट नमुना मानला जातो. मध्य भारतात वडवणी येथे तीर्थंकर ऋषभदेव यांची भव्य मूर्ती आहे.
चित्तोड किल्ल्यातील 80 फ
ू ट उंचीचा स्तंभ जैन स्थापत्याचा स्थापत्याचा उत्कृ ष्ट नमुना आहे. त्यावरील नक्षीकाम
वैशिष्ट्यपूर्ण आहे, जैनांनी खडकांमधून कलात्मक मंदिरे निर्माण क
े ली, त्यात राजगृह, पावापुरी, पालिठाणा,
गिरणार, दिलवाडा येथील मंदिरे प्रसिद्ध आहे. तसेच ओरिसातील हाथीगुंफा जैन मंदिर प्रसिद्ध आहे. जैनांनी
हस्तलिखितांवर चित्रे काढली. ती चमकत्या रंगांमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.